जितेंद्र आव्हाड यांचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल, म्हणाले...

दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केले होते.
Published by :
Team Lokshahi

दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. तसेच त्यांच्यावर अनेक टीका देखील होवू लागल्या आहेत. यावरूनच दिलीप वळसे पाटीलांवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला आहे. दिलीप वळसे पाटील हे मुळातच कुत्सित मनोवृत्तीचे असल्याचे आव्हाड म्हणाले आहेत. नागपंचमीच्या दिवशीच नाग बाहेर पडले असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com