अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका किरीट सोमय्यांनी घेतली मागे
अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका किरीट सोमय्यांनी घेतली मागे घेतली आहे. परब आणि कदम यांनी मुरुड येथे समुद्र किनारपट्टी नियमन क्षेत्र अधिनियमांचे याचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधलेले आहे. नियमाचे उल्लंघन केल्याने हे रिसॉर्ट पाडण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सोमय्या यांनी दाखल केली होती.
सदानंद कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून तेथे हे प्रकरण प्रलंबित आहे.त्यामुळे डॉ. सोमय्या यांनी एनजीटमधील याचिका मागे घेतली. दापोली मुरुड येथे समुद्र किनारपट्टी नियमन क्षेत्र अधिनियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री अनिल परब आणि परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्याविरोधात येथील राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. रिसॉर्टबाबतचा दावा मुंबई उच्च न्यायालय प्रलंबित असल्याने सोमय्या यांनी ही याचिका मागे घेतली आहे.
परंतु जर सोमय्या यांच्या तक्रारीचा निवाडा नाही झाला तर लवादामध्ये पुन्हा याचिका दाखल करण्याची मुभा त्यांना न्यायिक सदस्य न्यायाधीश दिनेश कुमार सिंह व तज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिलेली आहे.