Team India
Team India

Team India : टी-२० वर्ल्डकपमध्ये 'ही' जोडी उतरणार सलामीला? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

टी-२० वर्ल्डकपसाठी सर्वच संघ तयारीला लागले असून टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
Published by :

आयपीएलमध्ये टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. धकाडेबाज फलंदाजी करुन धावांचा पाऊस पाडणारे खेळाडू टी-२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर निवड समितीचं लक्ष वेधून घेत आहेत. अशातच टी-२० वर्ल्डकपसाठी सर्वच संघ तयारीला लागले असून टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर आता टीम इंडिया टी-२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी जोरदार तयारीला लागली आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंचं प्रदर्शन पाहून टी-२० वर्ल्डकप स्क्वॉडचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये खेळवण्यात येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी संघाला एक जबरदस्त समीकरणासह टूर्नामेंटमध्ये सहभागी व्हावं लागेल. अशातच टीम इंडियाच्या सलामी जोडीची चर्चा रंगली आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीसाठी पहिलं प्राधान्य रोहित शर्मा आणि विराट कोहलीला देण्यात येईल. तर शुबमन गिल बॅकअप ओपनर म्हणून खेळेल.

रोहित आणि विराटची जोडी टी-२० वर्ल्डकपला सलामीला उतरले, अशा चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. यशस्वी जैस्वाल वर्ल्डकपमधून बाहेर होऊ शकतो, असंही रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. तर राजस्थान रॉयल्ससाठी धडाकेबाज फलंदाजी करणारा रियान परागला टी-२० वर्ल्डकपमध्ये संधी मिळू शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com