अजित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मागणी

अजित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मागणी

Published by :

बेळगावसह कारवार, निपाणी बिदर, भालकी, हा भाग महाराष्ट्रात सामील करण्यात यावा. यासाठीचा लढा महाराष्ट्राच्या निर्मितीपासून सुरू आहे. कर्नाटक सरकारच्या अन्यायकारक भूमिकेमुळे या भागात राहणाऱ्या मराठी समाजाला नेहमीच त्रास सहन करावा लागला आहे. गेल्या साठ वर्षाहुन अधिक काळ मराठी बांधवांचा हा लढा कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात सुरू असून अद्यापही बेळगाव-कारवार निपाणी बिदर, भालकी हा भाग महाराष्ट्रात सामील करण्यासंदर्भात केंद्र सरकार पावले उचलताना दिसत नाही. आज पुन्हा एकदा या प्रश्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाचा फोडली आहे.

अजित पवारांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं पत्र

बेळगाव-कारवार सहित अनेक गावांचा जो सीमा प्रश्न आहे तो केंद्र सरकारने सोडवावा. या गावांना महाराष्ट्रात सामील करून घेतले जावे, अशा आशयाचं पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे.

बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न आहे, हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठिंबा देऊन सीमाभागातील मराठी बांधवांना पंतप्रधानांनी न्याय द्यावा, अशी महाराष्ट्रवासियांची इच्छा असल्याचे अजित पवारांनी पत्रात म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com