मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Published by :

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. नाशिक-मुंबई, मुंबई-पुणे-हैद्राबाद या हायस्पीड रेल्वेसंदर्भात हे महत्त्वाच पत्र मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पाठवल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये दोन बुलेट ट्रेन्सचा प्रस्ताव त्यांनी मोदी यांना दिला आहे.

नागपूर-नाशिक-मुंबई ही एक बुलेट ट्रेन करण्यात यावी. तसंच समृद्धी महामार्गाला नांदेडवरुन जालना असा मार्गही जोडला जाणार आहे, तोच मार्ग औरंगाबाद पुणे मुंबई असा करण्यात यावा आणि नांदेडवरुन तो मार्ग पुढे हैद्राबादला जोडला जावा आणि हैद्राबाद नागपूर मुंबई अशी एक बुलेट ट्रेन करण्यात यावी, असा प्रस्ताव पंतप्रधानांना दिलेला आहे. तसंच हैद्राबादचं मार्केट आणि मुंबईचं मार्केट दोन्ही जोडता येईल असा प्रस्ताव या पत्राद्वारे मांडण्यात आलेला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com