फडणवीसांना वास्तवतेची जाणीव होणं गरजेचं; सतेज पाटलांचा टोला

फडणवीसांना वास्तवतेची जाणीव होणं गरजेचं; सतेज पाटलांचा टोला

Published by :

निसार शेख, रत्नागिरी | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं विधान केलं होतं. या विधानावर सत्ताधारी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका केली होती. आता गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात सतेज पाटील यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत सतेज पाटील यांनी फडणवीस यांना वास्तवतेची जाणीव अजून झालेली नसून ती होणं गरजेचं आहे, असा टोला हाणला.त्यासोबत सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाली आहेत, अशी आठवण देखील सतेज पाटील यांनी फडणवीस यांना करून दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षबांधणीबाबत देखील त्यांनी काही सुचना केल्या आहेत. ज्या ठिकाणी आघाडी शक्य आहे. त्या ठिकाणी आघाडी होईल. स्थानिक पातळीवर हा निर्णय होईल. शक्य असेल त्या ठिकाणी एकत्र लढू आणि शक्य नाही त्या ठिकाणी शक्य नाही त्या जागेवर विरोधात लढून एकत्र येऊ असं देखील सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

आर्यन खान प्रकरणात एनसीबीनं केलेली कारवाई योग्य आहे. पण, त्यातील साक्षीदार आणि कारवाईबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तर एनसीबीला द्यावी लागतील असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

15 वर्षे हे सरकार टिकेल

भाजपला समाधान होईल असं आम्ही काहीही करणार नाही. सरकार म्हणून आम्ही एकत्र असून पुढील 15 वर्षे हे सरकार टिकेल असं देखील सतेज पाटील यांनी म्हटले. आमच्यामध्ये मतभेद किंवा मनभेद काहीही नाहीस असं देखील यावेळी पाटील यांनी म्हटलं आहे.

किरिट सोमय्यांना कायदेशीर उत्तर देऊ

सरकारला बदनाम करणे. सरकार पडणार नाही हे कळल्यामुळे आता सरकारला बदनाम करण्याचं काम किरिट सोमय्या करत असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या साऱ्याला कायदेशील उत्तर दिलं जाईल असं देखील पाटील यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com