महाराष्ट्र
लग्नाला आलेल्या पाहुण्यांवर मधमाशांचा हल्ला; 50 जण गंभीर जखमी
नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिरातील घटना
संजय राठोड | यवतमाळ : येथे लग्नात मधमाशांनी हल्ला केला असून पन्नास जण गंभीर जखमी झाले. ही घटना नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिरात घडली आहे. मधमाशांच्या हल्ल्यानंतर वधू-वरांकडील पाहुण्यांची एकच धावपळ उडाली आहे.
नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिरात लग्न सुरु असतानाच मधमाशांनी हल्ला केल्याने पाहुण्याची एकच धावपळ झाली. काही पाहुण्यांनी जंगलाकडे धाव घेतली तर काहींनी नाल्याच्या पाण्यात उड्या मारल्या आहेत. यामध्ये अन्नाचीही मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याचे समजत आहे. दरम्यान, आग्या मधमाश्यांचा पोळावर कोणीतरी दगड मारल्याने ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. तर, जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.