आर्यन खान प्रकरणात हायकोर्टाकडून दिलासा; समीर वानखेडे म्हणाले...

आर्यन खान प्रकरणात हायकोर्टाकडून दिलासा; समीर वानखेडे म्हणाले...

आर्यन खान प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई : आर्यन खान प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने वानखेडे यांना 22 मेपर्यंत अटकेपासून दिलासा देत तपासात सहकार्य करण्यास सांगितले. याप्रकरणी वानखेडे हे शनिवारी (20 मे) सीबीआय कार्यालयात जाऊन आपले म्हणणे नोंदवणार आहेत.

आर्यन खान प्रकरणात हायकोर्टाकडून दिलासा; समीर वानखेडे म्हणाले...
उद्धवजींचा पोपट मेला; फडणवीसांच्या टीकेचा अजित पवारांकडून समाचार, कुठं मेलय दाखवा

न्यायव्यवस्था आणि सीबीआयवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात सांगितले. माझी सीबीआयकडे कोणतीही तक्रार नाही पण एनसीबीचे अधिकारी आम्हाला टार्गेट करत आहेत. हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान यांच्यातील व्हॉटस अॅप चॅट जोडले आहे. याची माहिती त्यांनी ज्ञानेश्वर सिंह यांना दिली होती.

शाहरुख खानने समीर वानखेडे यांना लिहिले की, तुम्ही माझ्याबद्दल दिलेल्या सर्व विचार आणि वैयक्तिक माहितीसाठी मी तुमचे आभार मानू शकत नाही. मी खात्री करून घेईन की तो असा व्यक्ती होईल ज्याचा तुम्हाला आणि मला दोघांनाही अभिमान वाटेल. ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. तुम्ही एक चांगले माणूस आहेत. आज त्याच्यावर दया करा, मी विनंती करतो. यावर वानखेडे यांनी काळजी करू नका, असे उत्तर दिले.

दरम्यान, समीर वानखेडेवर आर्यन खानला आरोपी न बनवण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यासंदर्भात सीबीआयने वानखेडेविरोधात एफआयआर नोंदवला आहे. वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात नुकतेच सीबीआयने वानखेडे यांच्या घरावर छापेही टाकले होते. यानंतर सीबीआयने गुरुवारी (१८ मे) वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावले होते, मात्र ते हजर झाले नाहीत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com