मुख्यमंत्री राजीनाम्याची घोषणा करणार का?

मुख्यमंत्री राजीनाम्याची घोषणा करणार का?

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता फेसबूक लाईव्ह द्वारे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारणात वेगाने बदल घडत आहेत. आता नुकतीच मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेने आपल्या बंडखोर आमदारांना अल्टिमेटम दिला आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता फेसबूक लाईव्ह द्वारे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार, अशी माहिती ट्विटवरून देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जवळपास दीड तास ही बैठक चालली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com