महाराष्ट्र
“…अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊन देणार नाही”
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या ५ जुलैपर्यंत राज्य सरकारने मान्य न केल्यास पावसाळी अधिवेशन होऊन देणार नाही, असा इशारा शिव संग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिला आहे.
मराठा आमदारांनी सरकारवर दबाव टाकून मागण्या पूर्ण करून घ्याव्यात अशा आमदारांचा जाहीर सत्कार करू, अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा मेटेंनी दिलाय.
राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी बी़डमध्ये पहिला मराठा क्रांती संघर्ष मोर्चा निघाला. मराठे शांत आहेत विनाकारण कोणाच्या अंगावर जात नाहीत, परंतु कोणी अंगावर आल्यास शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. आणि सरकार तशीच वेळ आणेल अशी चिन्हे दिसत आहेत असे मेटे म्हणाले.