Lokshahi Marathwada Sanwad 2025 |  Ashok Chavan | "... हे स्थानिक नेतृत्वाचं अपयश", अशोक चव्हाणांचा रोख कुणाकडे?

Lokshahi Marathwada Sanwad 2025 | Ashok Chavan | "... हे स्थानिक नेतृत्वाचं अपयश", अशोक चव्हाणांचा रोख कुणाकडे?

'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकशाही मराठीचा एक गौरवशाली लोकशाही मराठवाडा संवाद २०२५ (Lokshahi Marathwada Sanwad 2025 ) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकशाही मराठीचा एक गौरवशाली लोकशाही मराठवाडा संवाद २०२५ (Lokshahi Marathwada Sanwad 2025 ) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून मराठवाड्याच्या भूमीतून आलेल्या दिग्गजांचा सत्कार केला गेला. तसेच मराठवाड्याच्या भविष्यासाठी राजकीय नेत्यांचं व्हिजन काय आहे? मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप कसा आहे, हे जाणून घेतलं.

या कार्यक्रमात अशोक चव्हाण (Ashok Chavan ) यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील पाणीप्रश्न, बीड प्रकरण यासोबतच राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, "छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक सरकारं आली, अनेक मंत्री झालेत. जायकवाडीसारखं धरण (Jayakwadi Dam ) त्यावेळेस बांधलं गेले नसते तर पाणीच मिळालं नसते. जायकवाडी धरणाला त्यावेळेस किती विरोध झाला होता हे ही मला आठवतं आहे. हा सगळा इतिहास मी जवळून पाहिलेला आहे. जायकवाडीमुळे आपल्या चार जिल्ह्यांना पाणी मिळतं. पिण्याचे पाणी आणि शेतीला पाणी. पाण्याचा तुटवडा नाही आहे वितरण व्यवस्था जी संभाजीनगरला व्हायला पाहिजे होती ती वर्षानुवर्षे रेंगाळत गेली. स्थानिक नेतृत्वाचे अपयश आहे. व्यक्तीगत कोणाला दोष देत नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने याकडे लक्ष केंद्रीत केलेलं आहे पाणी प्रश्न मार्गी लागेल. पाण्याची कमतरता नाही आहे. पाणी उपलब्ध आहे परंतु पाण्याची वितरण व्यवस्था या शहराला नसल्यामुळे मंजूर असूनही दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी निघून गेलेला आहे. परंतु या प्रश्नाला न्याय मिळत नाही कारण काम पूर्ण होत नाही, काम पूर्ण होत नसल्यामुळे मुंबई गोव्याचा प्रश्न झाला तसा हा प्रश्न झालेला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये रोजगार निर्मितीला वाव मिळाला आहे. आता संभाजीनगरचे भविष्य आम्हाला दिसतंय की, पहिल्यापेक्षा अधिक गतीने छत्रपती संभाजीनगर पुढे जाणार यात शंका नाही. पायाभूत सुविधा जर चांगल्या दिल्या तर पायाभूत सुविधेमुळे इंडस्ट्री यायला खूप मदत होते. उद्योग वाढीसाठी पायाभूत सुविधा ज्या आवश्यक आहेत त्या आता बऱ्यापैकी उपलब्ध झालेल्या आहेत. मी 100 टक्के गुण देणार नाही पण मी 50-60 टक्के गुण जरुर देईन. सगळ्या सोयी उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. लोकल नेतृत्वाने जर हा विषय लावून धरला दुमत नाही आहे. एकत्र यायची गरज आहे, समजून घ्यायची गरज आहे. जिसकी लाठी, उसकी भैस असं म्हणतात तसं जो माणूस तिथे मंत्रालयात जाऊन बसतो, काम करुन घेतो, पाठपुरावा करतो ते मार्गी लागते. सत्ताधारी पक्षात आहोत, आम्ही लावून धरतो, आम्ही कुठे कमी पडलो तर टीका करायला दानवे आहेत त्यांनी जोर लावावा तिथून, आम्ही इथून जोर लावतो. दोघांनी मिळून केलं तर आपोआप मार्गी लागेल. मराठवाड्यामध्ये नेतृत्व आहे. गेल्या काही वर्षामध्ये मराठवाड्यात जे काही नव्हते ते आता दिसायला लागले आहे. मराठवाडा मागे नाही आहे. जी शहर मुंबईच्या जवळ आहेत त्यांना मुंबईचा फायदा खूप मोठा आहे. आपण 611 किलोमीटर आहोत.

बीडवर बोलताना ते म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांमध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्यातून बीडची बदनामी खूप झालेली आहे. आता त्याच्यामध्ये चौकशी होईल, कारवाई होईल. राजकीय पक्ष कुठलेही असो गुन्हेगारांना राजाश्रय देण्याची जी काय सवय आहे तो बंद झाला पाहिजे. गुंडांना राजाश्रय मिळता कामा नये.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, आजची राजकीय परिस्थिती IPL मॅचसारखी झालेली आहे. ज्याला जिकडे सोईचे आहे त्याठिकाणी. राजकीय परिस्थिती खूप बदलत चाललेली आहे. मी काँग्रेसमध्ये अनेकवर्ष काम केलं आहे. भाजपमध्ये मी गेलो, मला दिसतंय की, चांगलं काम चालू आहे. प्रत्येक विभाग जोरात काम करतो आहे. या पक्षामध्ये गेल्यानंतर काहीना काही संधी, मला त्यांनी राज्यसभेवर काम करायला दिलेलं आहे, पुढे संधी देतील नाही देतील हा त्यांचा प्रश्न आहे. असे अशोक चव्हाण म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com