ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर अंबादास दानवेंनी मानले फडणवीस यांचे आभार

ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर अंबादास दानवेंनी मानले फडणवीस यांचे आभार

अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपामुळेच शिवसेनेचा विजय झाल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत.

अमोल नांदुरकर | अकोला : अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय झाला आहे. यावरुन मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. भाजपामुळेच शिवसेनेचा विजय झाल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. अशातच, शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर अंबादास दानवेंनी मानले फडणवीस यांचे आभार
'आघाडीचे सोळा झाले गोळा तरी भाजपाशिवाय जिंकता येणार नाही'

अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांचा मोठा विजय झाला. यावर भाजपकडून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. यातच आता भाजप नेत्यांकडून या विजयानंतर फडणवीसांचे आभार मानावे, असे वक्तव्य करण्यात येत आहेत. याला प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी दिले आहे. ते म्हणाले की, खरोखरच फडणवीसांचे आभार आम्ही मानलेच पाहिजे की त्यांनी आमचं चिन्ह, आमच्या पार्टीचे नाव गोठवलं. नोटांचे मताधिक्य ईव्हीएममध्ये वाढवलं. खरोखरच त्यांचा आम्हाला संपवण्याचे काम करण्याचा प्रयत्न केला, असा खोचक टोला दानवेंनी लगावला आहे.

ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर अंबादास दानवेंनी मानले फडणवीस यांचे आभार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड सहन करणार नाही : जयंत पाटील

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय. ऋतुजाताईंचे अभिनंदन. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप डझनभर पक्षांनी पाठिंबा देऊन ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले, ना मतं जास्त मिळाली. भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता, असे त्यांनी म्हंटले होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com