राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते? मात्र...; शिंदे गटाच्या 'या' खासदाराने सांगितले...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते? मात्र...; शिंदे गटाच्या 'या' खासदाराने सांगितले...

उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोलीच्या सभेतून खासदार भावना गवळी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
Published by :
Siddhi Naringrekar

उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोलीच्या सभेतून खासदार भावना गवळी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या वर्षी एक रक्षा बंधन झालं होतं. राखी बांधली आणि ईडी थांबली, असं सांगतानाच हिंमत असेल तर बिल्किस बानोंकडून राखी बांधून घ्या.

यावर आता प्रतिउत्तर देत भावना गवळी म्हणाल्या की, 40-50 आमदार शिंदे यांच्यासोबत का जातात? याचंही चिंतन केलेलं नाही. माझ्यासारखी कर्तृत्वान महिला शिवसेनेत पाचवेळा निवडून आली. माझ्या मतदारसंघात मी गेल्या 24 वर्षापासून रक्षा बंधनाचा कार्यक्रम राबवते. उद्धव ठाकरे यांना कधी नातं टिकवताच आलं नाही. त्यामुळे या नात्यावर आणि पवित्र बंधनावर बोलत असतात. साहेब तुम्ही कधीच कुणाला चांगली वागणूक दिली नाही.

तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं कधीच मिटलं असतं. पण त्यावर त्यांनी कधीच निर्णय घेतला नाही. उद्धव ठाकरे यांनाच राज ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यायचं नव्हतं. मी वाजपेयींना राखी बांधली. मोदींना मी राखी बांधते. त्यामुळे या बंधनावर तुम्ही बोलू नये. तुम्ही कधी बंधन पाळलं नाही. म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. असे भावना गवळी म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com