Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

"येवढं मोठं परिवर्तन राज्यात कधी झालं नाही आणि होणारही नाही" मुख्यमंत्र्यांचं विधान

नंदुरबार दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना अनेक मोठ्या निर्णयांचा उल्लेख केला.
Published by :
Vikrant Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नंदुरबार दौऱ्यावर आहेत. नंदुरबार दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना अनेक मोठ्या निर्णयांचा उल्लेख केला. तर, त्यांनी पुन्हा एकदा 'हे जनतेचं सरकार असल्याचं म्हटलंय.

Eknath Shinde
"55 मधले 40 आमदार फुटले म्हणजे तुमच्यात काहीतरी कमतरता आहे" गुलाबराव पाटलांचा घणाघात

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

  • आम्ही शिवसेना वाचवण्याच्या भुमिकेतून पुढे आलोय

  • येवढं मोठं परिवर्तन राज्यात कधी झालं नाही आणि होणारही नाही

  • आम्ही अनेक ठिकाणी मेळावे, सभा घेतल्या सभांना उत्स्फुर्त गर्दी आहे

  • हे लोकांच्या मनातलं सरकार आहे

  • आम्ही सण-उत्सव पुन्हा सुरू केले

  • गेल्या अडीच वर्षांत अनेक विकासकामं थांबली होती

  • आम्ही पुन्हा प्रकल्प सुरू केले

  • आम्ही आतापर्यंत 72 मोठे निर्णय घेतलं.

  • NDRF च्या दुप्पट मदत आम्ही दिली

  • निकषांत न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा निर्णय घेतला

  • 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत एस टी प्रवास दिला

दरम्यान, या भाषणात मुख्यमंत्र्यांनी जरी शेतकऱ्यांना केलेल्या मदतीचा उल्लेख केला असला तरी विरोधकांकडून ही मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळालीच नसल्याचं म्हटलं जातंय

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com