devendra fadnavis uddhav thackeray
devendra fadnavis uddhav thackerayTeam Lokshahi

Devendra Fadnavis | 'मुख्यमंत्र्यांविरोधात बोलले तर तुम्हाला पाच ठिकाणच्या जेलमध्ये जावे लागेल'

देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

नागपूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात एक अक्षरही बोलले तरी तुम्हाला किमान पाच ठिकाणच्या जेलमध्ये जावे लागेल, पण देशाच्या पंतप्रधानांबद्दल कोणतीही भाषा वापरली तरी महाराष्ट्र सरकार त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही. हीच परंपरा आता महाराष्ट्र सरकारने कायम केली आहे, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सामनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकारला मसणात जावे लागेल, या टिकेला दिले. ते नागपुरात माध्यामांशी बोलत होते.

devendra fadnavis uddhav thackeray
Bailgada Sharyat | शर्यत बैलगाड्यांची, चर्चा मात्र बक्षीसांच्या जेसीबी, जीप, ट्रॅक्टरची

मुख्यमंत्र्यांना राणा यांनी शनी म्हंटले याबद्दल विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोण काय बोलते तो त्यांचा प्रश्न आहे. पण, सगळ्यांनी योग्य भाषेचा वापर करावा. तर महाराष्ट्रामध्ये कायदा आहे की मुख्यमंत्र्यांविरोधात एक अक्षरही बोलले तरी तुम्हाला किमान पाच ठिकाणच्या जेलमध्ये जावं लागेल. पण, पंतप्रधानांबद्दल कोणतीही भाषा वापरली तरी महाराष्ट्र सरकार त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही. हीच परंपरा आता महाराष्ट्र सरकारने कायम केली आहे, असा निशाणा फडणवीसांनी ठाकरे सरकारवर साधला आहे.

devendra fadnavis uddhav thackeray
मान झुकेल असं कोणतंही काम आम्ही केलं नाही - PM मोदी

ते पुढे म्हणाले, कुणी हनुमान चलिसा पठण करत असेल तर चांगलंच आहे. कोणालाही त्यापासून रोखता येत नाही. कोणी जर रोखत असेल तर ते चुकीचेच आहे. तर भारतात, महाराष्ट्र किंवा नागपूरमध्येही हनुमान चालिसावर कोणीही बंदी घालू शकत नाही. त्यामुळे हनुमान चालीसा यासंदर्भात राजकारण करण्याचे काम नाही. ज्यांना हनुमान चालीसा पठण करायचे आहे त्यांना करू द्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहेत.

devendra fadnavis uddhav thackeray
Nana Patole | 'वानखेडेंवर कोणतीही कारवाई होणार नाही'

नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्रातील पोलिसांना संसदेच्या प्रिव्हीलेज कमिटीने बोलावले आहे. यासंदर्भात फडणवीस बोलताना म्हणाले की, अधिकाऱ्यांना संसदीय समितीने बोलावले आहे. तो प्रिव्हीलेज समितीचा अधिकार आहे, असे मला वाटते. कोणतीही तक्रार असेल तर त्यासंदर्भात कमिटी बोलावत असते. ते नेमकं काय करणार आहे मी सांगू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com