Devendra Fadnavis
Devendra FadnavisTeam Lokshahi

दगडाला सोन्याची नाणी तर नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

आजची लढाई सत्तेसाठी नसून व्यवस्था परिवर्तनाची लढाई : फडणवीस
Published by :
Team Lokshahi

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पुन्हा एकदा पाणी प्रश्नावरुन राजकारण तापू लागले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आज भाजपचा जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

Devendra Fadnavis
भाजपचा जलआक्रोश मोर्चा LIVE : पाणी मिळाल्याशिवाय आक्रोश संपणार नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलआक्रोश मोर्चा संभाजीनगरच्या इतिहासातला सर्वात अभूतपूर्व मोर्चा आहे. आजची लढाई सत्तेसाठी नसून व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे. आम्ही संघर्ष सुरु केला आहे आणि जोपर्यंत संभाजीनगरमध्ये पाणी पोहचत नाही. तोपर्यंत सरकारला रात्री स्वस्थ झोपू देणार नाही. असा निर्धात त्यांनी बोलून दाखवला.

Devendra Fadnavis
फडणवीसांच्या गाडीला रस्ता देण्यासाठी केंद्रीय मंत्री उतरले रस्त्यावर

आपल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांना सांगितले की पाणी येत नाही तर ते त्याच्यावर काहीच करायला तयार नाही. ते म्हणतात मी म्हणतो म्हणून संभाजीनगर समजा, मी म्हणतो म्हणून बेफिकर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, अशा प्रकारचे आश्वासन आमचे मुख्यमंत्री देतील. कारण ते म्हणतात ती काळ्या दगडावरची रेष आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

हर गर्मी में संभाजीनगर की यही कहानी है, हलख में प्यास है और आंखों में पाणी है, ऊपरवाले तेरे से कोई गिला नही है ये तो निचेवाले तेरे बंदो की बेईमानी आहे, असा निशाणाही फडणवीसांनी शायरीतून शिवसेनेवर साधला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com