Jalna Maratha Reservation Protest प्रकरणी एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मुंबई : येथील अंतरवली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या मराठा आक्रोश मोर्चाचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत हवेत गोळीबार केला आहे. यावर सर्वच स्तरावरुन प्रतिक्रिया उमटत असून निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना लाठीचार्ज प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही प्रतिक्रिया समोर येत आहे. लाठीचार्जची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
काय घडले नेमके?
जालन्याच्या अंतरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आक्रोश मोर्चाचं उपोषण मागील चार दिवसांपासून सुरु होते. उपोषणा दरम्यान आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली. जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने पोलिसांकडून उपोषण थांबवण्याचं प्रयत्न सुरु होते. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. गावकऱ्यांनी दगडफेक केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.