राजकारण
राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजणार; या महिन्यात निवडणुका लागण्याचे संकेत
राज्यात निवडणुका लवकर होणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात निवडणुका लवकर होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात 23 महानगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांच्या निवडणुका होतात. राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आयोगाच्या राजपत्रात उल्लेख आहे.
याच पार्श्वभूमीवर आता राज्य निवडणूक आयोगाने येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.