Girish Mahajan : निकाल चुकीचा वाटत असेल तर सर्वोच्च न्यायालयात जा

Girish Mahajan : निकाल चुकीचा वाटत असेल तर सर्वोच्च न्यायालयात जा

शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट करत शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, उद्धवजींना वाटत असेल की निकाल चुकीचा, सुप्रीम कोर्टाविरोधात निकाल वाटत असेल, तर सर्वोच्च न्यायालयात जावं. न्याय मागावे. असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, नार्वेकरांवर टिप्पणी योग्य नाही, आक्षेपार्ह आहे. उद्धव आणि संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर बोलणे शोभनीय नाही. त्यांच्यासाठी सर्वोच न्यायालयाचे दारं उघडे आहे. असे महाजन म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com