...तर राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही;
गिरीश महाजनांचा इशारा

...तर राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; गिरीश महाजनांचा इशारा

वीर सावरकरांच्या मुद्द्यांवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

जळगाव : वीर सावरकरांच्या मुद्द्यांवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात शिंदे गट व भाजप राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. अशातच, स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी भाजप मंत्री गिरीश महाजनांनी राहुल गांधींना थेट इशारा दिला आहे.

...तर राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही;
गिरीश महाजनांचा इशारा
ठाकरे गटाला नागपुरात धक्का! जिल्हा समन्वयक दिलीप माथनकर यांचा भाजपात प्रवेश

जळगाव येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या गौरव यात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करण्यात येणार आहे. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल यापुढे राहुल गांधी काही बोलले तर काय किंमत मोजावी लागेल ते मोजू. मात्र, त्यांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असा थेट इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेस पक्षांकडून होत असलेला अपमानाविरोधात जनतेला सावरकर यांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी ३० मार्चपासून राज्यातील २८८ मतदार संघात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com