Jayant Patil : निवडणूक आयोग योग्य निर्णय देईल असं वाटतंय

Jayant Patil : निवडणूक आयोग योग्य निर्णय देईल असं वाटतंय

आज निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबतची पहिली सुनावणी पार पडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबतची पहिली सुनावणी पार पडणार आहे. शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी हे युक्तीवाद करणार आहेत. त्यांच्या गटाकडून ८ ते ९ हजार शपथपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, निवडणूक आयोग योग्य निर्णय देईल असं वाटतंय. वस्तूस्थिती पाहता पक्ष शरद पवारांसोबत. पक्षाचं बहुमत असताना राष्ट्रपती राजवटीला अर्थ नाही. आयोग चुकीचा निर्णय घेणार नाही. आमदार गेला म्हणजे पक्ष गेला नाही. पक्ष, चिन्ह मिळेलं असं समोरच्यांना जास्त आत्मविश्वास. असे जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com