तरुणांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा विडाच सरकारने उचललायं; नाना पटोलेंचा हल्लाबोल

तरुणांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा विडाच सरकारने उचललायं; नाना पटोलेंचा हल्लाबोल

राज्य सरकारने आता सरळ सेवेतील कंत्राटी भरतीनंतर तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन नाना पटोले यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

पुणे : राज्य सरकारने आता सरळ सेवेतील कंत्राटी भरतीनंतर तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. नायब तहसीलदार, कारकून पद ही कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. यावर एमपीएससी विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. तर, आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. यावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

तरुणांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा विडाच सरकारने उचललायं; नाना पटोलेंचा हल्लाबोल
ओबीसीच्या बैठकीत अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये खडाजंगी

नाना पटोले म्हणाले की, शेतकरी, कामगार, कष्टकरी, नोकरदार, छोटे व्यापारी यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर आता अधिकाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे, अशा शब्दात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सोडले आहे.

तर, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार व नायब तहसीलदार पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात तात्काळ रद्द करुन सरकारने नोकर भरतीसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडावी अन्यथा तरुणांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

दरम्यान, सरकराने तहसीलदार पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयान ही जाहिरात काढली आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. यावर एमपीएससी विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. तहसीलदार पदासारखी जागा जर कंत्राटी पद्धतीने भरली तर आम्ही करणार काय? असा सवाल विद्यार्थ्यांनी सरकारला विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com