राजकारण
मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव; राहुल गांधी काय बोलणार?
राहुल यांना सोमवारीच खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली.
राहुल यांना सोमवारीच खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली.मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव असणार आहे.मोदी सरकारविरोधात 2014 नंतर आलेला हा दुसरा अविश्वास प्रस्ताव आहे. याआधी 2018 मध्ये टीडीपी सरकारनं अविश्वास प्रस्ताव आणला होता.
मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर आज दुपारी 12 वाजल्यापासून चर्चा होणार आहे. या मुद्द्यावर राहुल गांधी काय बोलणार याकडे सध्या लक्ष लागलंय. याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत.
मणिपूरच्या मुद्दयावर अनेक दिवसांपासून संसदेत गोंधळ सुरु होता. मणिपूरच्या मुद्दयावर पंतप्रधान मोदी बोलायला तयार नसल्यानं या अविश्वास प्रस्तावाची रणनीती काँग्रेस आणि विरोधकांकडून आखली गेली.