आरएसएस प्रमुख मोहन भागवत खोटारडे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

मोहन भागवत यांनी संबोधित करत मणिपूर येथील हिंसाचाराबद्दल विधान केले. या विधानावर प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केली

अकोला : विजयादशमीनिमित्त नागपूर येथील संघ मुख्यालयातून आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी संबोधित करत मणिपूर येथील हिंसाचाराबद्दल विधान केले. या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केली असून मोहन भागवत हे खोटारडे असल्याचा हल्लाबोल केला आहे.

इमर्जन्सीमुळे मणिपूर येथे हिंसाचार झाल्याचे विधान मोहन भागवत यांनी याआधी केले होते. परंतु, मणिपूरचे आरबी चीफ यांनी मणिपूरमध्ये इमर्जन्सी नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे मोहन भागवत हे खोटे बोलत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आरएसएसने नैती आणि कुकी आदिवासीमध्ये भांडण लावून दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com