"मोदी-शाहांनी फडणवीसांचे पंख कापले", संजय राऊत म्हणाले...

"मोदी-शाहांनी फडणवीसांचे पंख कापले", संजय राऊत म्हणाले...

प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की मी वेडा नाही. प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही. ही मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून सुद्धा देवेंद्र फडणवीस वेगळे नाही अशी टीका संजय राऊतांनी केली.
Published by :
Dhanshree Shintre

भाजपकडे पंतप्रधानासाठी एकचं चेहरा आहे मात्र इंडिया आघाडीकडे खूप चेहरे आहेत. आम्ही पंतप्रधानपदावर कधीच चर्चा करत नाही आणि करण्याची गरज नाही. आमच्याकडे खूप चेहरे आहेत. त्यातला एक चेहरा प्रधानमंत्री होईल. आमची इच्छा आहे की राहूल गांधीजी आहेत त्यांनी नेतृत्व करावं देशाचं आणि वारंवार सांगत आलो आहे ना तर राहूल गांधी विरक्ते आहेत ते पक्षाचा प्रचार करतायेत, ते इंडिया आघाडीचा प्रचार करतायेत पण त्यांना सत्तेचा लोभ नाही असं संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की मी वेडा नाही. प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही. ही मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून सुद्धा देवेंद्र फडणवीस वेगळे नाही. उद्धव ठाकरेंनी जे सांगितले आहे ते खरं आहे शंभर टक्के सत्य आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा जी झाली त्यानुसार तेव्हा आमचे संबंध फार चांगले होते. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवून मी दिल्लीत जाईन. दिल्लीत अर्थमंत्री होईन, दिल्लीत गृहमंत्री होईन, प्रधानमंत्री होईन त्यांचं स्वप्न मोठं होतं आणि ते स्वप्न बाळगायला काही हरकत नाही. महाराष्ट्राच्या नेत्याला असं नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्की त्याच्या पाठीशी उभे राहतो. पण त्यांचं हे स्वप्न बहुदा मोदी आणि शाहांना आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री केलं असं मला एकांदरीत जे काय राजकारण मला कळतंय त्यानुसार दिसतंय. इतकं मोठं स्वप्न जेव्हा फडणवीस पाहायला लागले तेव्हा मोदी आणि शाहांनी काही निर्णय घेतला त्यालाच मोदी आणि शाहांची राजनिती म्हणतात, असा दावा संजय राऊतांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com