खातेवाटपावरून शिंदे गटात नाराजी? Sanjay Rathod काय म्हणाले...

सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

यवतमाळ: शिंदे-फडणवीस-पवार सरकार खातेवाटपाचा तिढा अखेर सुटलेला आहे. त्याबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून हे सरकार काम करीत आहे. नव्याने सरकारमध्ये अजित पवार आल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यात खाते बदल झाल्याने नाराज नसल्याची स्पष्टोक्ती संजय राठोड यांनी दिली.

मृदु व जलसंधारनाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे आहे. त्यामुळे त्यांचे स्वप्न पुढे नेण्यासाची जबाबदारी आहे, असेही मंत्री राठोड यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com