सुषमा अंधारे म्हणाल्या, अजित दादा पवार हे मुख्यमंत्री होणार असल्यामुळेच...
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना साथ देत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवारांनी घेतली. याच पार्श्वभूमीवर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक प्रतिक्रिया देखिल येत आहे. यातच अजून खातंवाटप आणि मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्यातील मंत्री मंडळाचा विस्तार होण्यासाठी वेळ लागतो आहे. याचे कारण अजित दादा पवार हे मुख्यमंत्री होणार असल्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाला उशीर होतोय असं विधान सुषमा अंधारे यांनी पुण्यात केला आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांवर सामूहिक अंत्यसंस्कार सुरू असताना राज्यातील भाजपाचे मंत्री आणि त्यांचे सहयोगी सदस्य शपथविधी घेत होते हे राज्यातील कलंकित सरकार आहे.