Budget Session : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत झालीच पाहीजे; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरु होणार आहे. आज महाराष्ट्राचे आर्थिक धोरण सभागृहामध्ये जाहीर केलं जाणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्प उद्या (9 मार्च) सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा सहावा दिवस असून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडी आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
शेतकरी संकटात सापडला आहे. अचानक पावसाच्या येण्याने अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. पावसाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली पाहिजे अशा घोषणा देत विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन सुरु आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत...अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे... जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा... कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही...बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे... मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी... नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा... अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.