Manoj Jarange On Chhagan Bhujbal : 'काही लोकं जातीवाद करतात'; जरांगेंचा मुलींच्या शिक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांना अप्रत्यक्ष टोला
मराठा समाजासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, "सगळ्या जातीच्या मुलींना शिक्षण मिळावं म्हणून आम्ही मागणी केली. त्यांनाही शिक्षण मोफत मिळावं म्हणून काम केले, मात्र काही लोकं जातीवाद करत आहेत," असं म्हणत भुजबळ यांचं नाव न घेता मनोज जरांगे यांनी टीका केली. "70 वर्षात आम्ही लढा लढलो, सगळ्या जातीसाठी आम्ही काम केलं, मराठ्यांच्या आंदोलनामुळे सर्व जातीच्या मुलींना मोफत शिक्षण मिळालं, असं इतर जातीच्या मुलींनाही वाटलं पाहिजे."
"आदिवासी लोकांच आरक्षण काढून धनगर समाजाला द्यावं, अस आम्ही म्हणत नाही. पण धनगर समाजानेही आदिवासी असल्याचं पुरावे दिले. त्यांची लेकरं ही रान-मळा, डोंगर-दऱ्यात फिरतात. म्हणून आपण त्यांनाही त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं, अशी मागमी केली आहे. मात्र हे फक्त ओबीसी-ओबीसी करत आहेत. पण हे कुठं त्यांना आरक्षण मिळावं म्हणून म्हणतात," अस म्हणत पुन्हा जरांगे पाटील यांची छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.
जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, "29 ऑगस्टच्या आत सगळ्या मागण्या मान्य केल्या नाही, आम्ही बैठका घेतल्या नाही, तरी मराठा समाज मोठ्या संख्येने मुबंईत दाखल होतील. सामाजातील लोकं आपल्या लेकरांच्या हक्कासाठी मुंबईत येतील. काही लोकं सोडायला येतील, काही लोक वीस-बावीस दिवस त्या ठिकाणी तयारी करून येतील, अस म्हणत जरांगे पाटील यांनी कर्मचारी, शेतकरी, व्यावसायिक यांनी फक्त आम्हला ट्रॅक्टर, ट्रक, मोटारसायकल घेऊन सोडायला या, आपल्या लेकरांच्या भवितव्यासाठी मुंबईत येण्याचं आव्हान ही समजला केल आहे," असं यावेळी म्हणाले.
पहलगाम हल्यावर ही बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, "दहशतवाद्यांना आतापर्यंत मारून टाकायला हवं होतं, हे नुसतं विमान पळवता, कुठं तळ नाही, कुठं पाणी बंद केलं ?, विमान पळवताय नुसतं डिझेल जाळतात, सगळा देश यांच्या पाठीशी आहे. मात्र हे काहीच करत नाहीत."