Mumbai Water Crisis : 'या' दिवसांपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात

Mumbai Water Crisis : 'या' दिवसांपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात

1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईत पावसाला सुरवात झाली असली तरी पुरेसा पाणीसाठा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत केवळ 6.97 टक्के पाणी शिल्लक आहे.

त्यामुळे आता 1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.एक टक्के पाणीसाठा हा तीन दिवसासाठी पुरतो त्यामुळे जवळपास 26 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.मागच्या वर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे पुरेसा पाणीसाठा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com