ताज्या बातम्या
राहुल गांधींवर कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना भारताबाहेर काढलं पाहिजे - नितेश राणे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मानहानी प्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मानहानी प्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. अशातच, राहुल गांधी यांची आता खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याचा विरोधकांनी जोरदार निषेध केला असून टीकास्त्र सोडले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींवर कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. राहुल गांधींना पाकिस्तानात पाठवा. ओबीसींच्या नावाने चुकीचं बोलता, मग संसदीय पद्धतीने कारवाई झाल्यावर बीजेपीच्या नावाने का बोंबलता? असे नितेश राणे म्हणाले.