Operation Sindoor:  Asaduddin Owaisi : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; असदुद्दीन औवैसी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Operation Sindoor: Asaduddin Owaisi : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; असदुद्दीन औवैसी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.

भारताकडून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor ) अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनी ही कारवाई केली.

याच पार्श्वभूमीवर आता एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi ) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, 'पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर आपल्या संरक्षण दलांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे मी स्वागत करतो. पाकिस्तानला अशी अद्दल घडवली गेली पाहिजे की पुन्हा कधीही दुसरं पहलगाम होणार नाही. पाकिस्तानचे दहशतवादी पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट केले पाहिजेत. जय हिंद!'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com