ताज्या बातम्या
आजपासून राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू
आजपासून राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
आजपासून राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन पद्धतीने आवेदन अर्ज उमेदवारांना सादर करता येणार आहे. राज्यात 17 हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत देण्यात आलेली आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. संकेतस्थळांवर भरतीसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. मुंबईत सुमारे साडे तीन हजार पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती मिळत आहे.
तसेच मुंबईत पोलीस शिपाई पदासाठी 2 हजार 572 जागा, चालक पदासाठी 917 जागा, तर इतर 24 पदांसाठी भरती होणार आहे.