१७०० कोटींची नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधी ट्वीटरवर म्हणाले, "जेव्हा सरकार बदलेल..."
प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला तब्बल १७०० कोटी रुपयांची नोटीस पाठवलीय. ही नोटीस मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सीबीआय, ईडीला धारेवर धरलं आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. "जेव्हा सरकार बदलेल तेव्हा लोकशाहीची दडपशाही करण्यांवर नक्कीच कारवाई होणार. त्यानंतर असं काही करण्याची कुणाचीच हिंमत होणार नाही", असा इशारा राहुल गांधी यांनी सीबीआय आणि ईडीला दिला आहे.
काँग्रसने पत्रकार परिषद घेऊन भाजपवर कर दशहतवाद पसरवल्याचा आरोप केला आहे. तसच भाजप लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा हल्लाबोल काँग्रेसने भाजपवर केला आहे. तसंच राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं, राहुल गांधी यांनी ट्वीटरवर म्हटलंय, जर सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांनी व्यवस्थित काम केलं असतं, तर असं काही घडलं नसतं. कोणत्या ना कोणत्या दिवशी भाजपच सरकार बदलेल आणि मग कारवाई होणार, याचा त्यांनी विचार करावा. अशी कारवाई होईल की अशाप्रकारच्या गोष्टी कधीच होणार नाही, याची मी शाश्वती देतो.