'ही लढाई धर्माची व अधर्माची, या भ्याड हल्ल्याला आपण दमदार उत्तर देणार'; सरसंघचाकल मोहन भागवत यांचा इशारा
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता सरसंघचालक यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या असून दहशतवाद्यांना दमदार उत्तर देणार असल्याचे म्हणले आहे.
"पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला आपण दमदार उत्तर देणार आहोत," असा इशारा सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे. तसेच त्यांनी नमूद केले की, "दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांना धर्म विचारून मारलं. हिंदू कधीही अस करणार नाहीत. आपण सर्वांनी देशात एक राहिलं पाहिजे. मात्र काही लोक सुधारतच नाहीत. त्यामुळे रावणाचा वध श्रीरामाला करावा लागला. आपल्याकडे जर कोणी वाकड्या नजरेच पाहिलं, तर त्याचा डोळा फोडू," असा इशारा मोहन भागवत यांनी दिला. "आता जी लढाई सुरू आहे, ती पंथ संप्रदायाची लढाई नाही. पंथ संप्रदायाचा आधार आहे. ही लढाई आहे धर्माची, अधर्माची. आपल्या जवानांनी किंवा लोकांनी कधी कोणाला धर्म विचारून मारलं नाही, पण काल ज्या कट्टरपंथीयांनी उत्पाद केला, त्यांनी धर्म विचारून मारलं. हिंदू अस कधीही करणार नाहीत. पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे असं करतील. रावण सुधारावा म्हणून रामाने त्याचा वध केला."