ग्रामपंचायत निवडणूक निकाल; संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेचा पहिला विजय
Admin

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेचा पहिला विजय

ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा मिळवते. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

या निकालांमध्ये नाशिकमधील देवळा येथील वासोळ ग्रामपंचायतीमध्ये संभाजीराजेंच्या स्वराज संघटनेला पहिलं यश मिळालं आहे. स्वराज संघटनेने वासोळ ग्रामपंचायतीवर विजयाचा झेंडा फडकला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये भाजपा आणि शिंदे गटाने ३६० ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर मविआने ३६३ ठिकाणी बाजी मारली आहे.

राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी ७४ टक्क्यांपर्यंत मतदानाची आकडेवारी गेली होती, सदस्यांसह थेट सरपंचांची निवड करणाऱ्या या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com