पुलवामा हल्ला पूर्वनियोजित, निवडणुका जिंकण्यासाठी हा हल्ला - संजय राऊत

पुलवामा हल्ला पूर्वनियोजित, निवडणुका जिंकण्यासाठी हा हल्ला - संजय राऊत

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे नेहमी काहीना काही त्यांच्या विधानाने चर्चेत असतात.
Published by :
Siddhi Naringrekar

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे नेहमी काहीना काही त्यांच्या विधानाने चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काही विधान केलं आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींविषयी एक गौप्यस्फोट केला आहे.

पुलवामा हल्ला जेव्हा झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गप्प राहायला सांगितले. गृहमंत्रालयाच्या चुकीमुळे 40 जवानांना जीव गमवावा लागला. पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराबाबत राग नाही. मोदी सरकारच्या चुकीमुळे हा हल्ला झाला. असे मलिक म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, सत्यपाल मलिक यांनी स्फोटक सत्य समोर आणलं. पुलवामा हल्ला पूर्वनियोजित होता. मोदी सरकारच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल झाला पाहिजे. पुलवामा हल्लावेळी RDX पोहचले कसे. निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा हल्ला. असे राऊत म्हणाले.

पुलवामा हल्ला पूर्वनियोजित, निवडणुका जिंकण्यासाठी हा हल्ला - संजय राऊत
मोदी सरकारच्या चुकीमुळे पुलवामा हल्ला; मोदींनी त्यावेळी गप्प राहण्यास सांगितले; सत्यपाल मलिक यांच्या गौप्यस्फोट
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com