'मोदींच्या बहिणीनेच सांगतलं, EVM मुळे निकाल बदलले जाऊ शकतात'; संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
नाशिकमधील शिवसेनेच्या निर्धार शिबिरात खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ईव्हीएममधील घोटाळ्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत विविध विषयांवर सरकारला उद्देशून भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना संजय राऊत यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकते, ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात, असे मोदींच्या बहिणीनेच सांगितले आहे, असं म्हटलं.
पुढे संजय राऊत म्हणाले की, "आम्हाला मार्ग दाखवणारे उद्धव ठाकरे आहे. मी फक्त एवढेच सांगू इच्छितो. हे शिबीर नाशिकच्या शिवसैनिकांच्या मेहनतीने पार पडले आहे. ही शिवसेनेची ताकद आहे. आज आपल्याकडे सत्ता नाही. पण शिवसैनिकांनी मनावर घेतले तर शंभर सोहळे पार पडू शकतो. अनेकांना वाटत शिवसेनेचा पराभव झाला शिवसैनिक घराबाहेर पडणार. परंतू आजच्या शिबिराने दाखवून दिले की शिवसैनिक दणदणीत आणि खणखणीत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष आपण पाहिला. त्यात कवी कलश होते. त्यांना सुचत नव्हते, त्यांना कवी भूषणने एक मंत्र दिला. कवी भूषण सांगतो, मन के माने जित है, मन के माने हार... हार गये जो बिना लढे उन पर है धिक्कार, या ओळींची त्यांनी आठवण करून दिली."