Sunil Prabhu
Sunil PrabhuTeam Lokshahi

वॉटर टँकर असोसिएशने संपानंतर मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी आमदार सुनील प्रभूंचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या कार्यालयाद्वारे ३ फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेले जाचक परिपत्रक तात्पुरत्या कालावधीकरिता रद्द करण्याची मागणी
Published by :
Sagar Pradhan

मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर अथोरिटीच्या या नियमांची अंमलबजावणी ही फक्त मुंबईत केली जात असल्याने या विरोधात 8 फेब्रुवारी मध्यरात्री पासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशने संप पुकारला होता. त्यांनतर या संपामुळे मुंबईतील अनेक हॉटेल, मॉल्स आणि रुग्णालयांना फटका बसला. त्यानंतर आता त्याच विषयावरून शिवसेना ठाकरे गट आमदार सुनील प्रभू यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये त्यांनी पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या कार्यालयाचे जाचक परिपत्रक तात्पुरत्या कालावधीकरिता रद्द करण्याची मागणी केली आहे.

काय आहे सुनील प्रभू यांच्या पत्रात?

मुंबई शहर हे भारताची आर्थिक राजघानी म्हणून ओळखली जाते या शहराला बृहन्मुंबई महानगपालिका सक्षमपणे पाणी पुरवठा करते त्या सोबतच खाजगी टंकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. टँकरद्वारे निवासी गृहनिर्माण संस्था, व्यावसायीक इमारती, मुंबई पोर्टट्रस्ट, नेव्हहडॉक, कोस्टलरोड प्रकल्प, शिवडी न्हावाशेवा प्रकल्प, रेल्वे यार्डस्‌, रुग्णालये, मेट्रो, एमएमआरडीएद्वारे सुरु असलेले प्रोजेक्ट, मुंबई महानगरपालिकेद्वारे सुरु असलेले पायाभूत सुविधा विकास प्रकल्प तसेच इमारत पुर्नविकास व पुर्नवांघणी प्रकल्प, बीकेसी, शिर्पीग कॉर्पोरेशन इंडिया, सिमेंटप्लॅन्ट, खासगी व महापालिका उद्याने, खेळाची मैदाने, रिफायनरी,सुलम श्यौचालये,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ, बँक, औद्योगिक वसाहती, बीएसटी डेपो, झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प, हॉटेल, उपहारगृहे, शाळा इत्यादी अनेक ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येतो.

पोलिस आयुक्‍्त,बृहन्मुंबई यांच्या कार्यालयाद्वारे जाहिर केलेले परिपत्रक जाचक असून याच्या विरोधात गुरुवार दि. ८ फेब्रूवारी पासून संपूर्ण टॅंकर असो. संप केला असून याचा त्रास उपरोक्‍त सर्व सेवा सुविधांवर झाला असून झाळा, कॉलेज, महाविद्यालये, रुग्णालये आणि इतर मूलभूत सुविधा पुरविणा-या संस्था व आस्थापने कोलमडण्याच्या अवस्थेत असून सामान्य मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्तसेच कामानिमित्त मुंबई शहराला भेट देणा-या प्रवश्यांना देखील याचा फटका पडत असून उपहारगृहे आणि निवासी हॉटेलना देखील अडचणींचा सामना करावा लागत असून मुलभूत सुविधे अमावी जनजीवन विस्कळीत होत आहे.

यास्तव संदर्मीय परिपत्रक तात्पुरत्या कालावधीकरिता रद्द करुन व मुंबई वॉटर टँकर असो. (नोंदणीकृत) समन्वयाने, सर्व समावेशक असे नविन परिपत्रक काढणे. आवश्यक आहे. जेणेकरुन उपरोक्‍त संस्था व आस्थापनांना सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकेल. तरी, सामान्य मुंबईकर जनतेला तात्काळ दिलासा देण्याच्या दृष्टीने, पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या कार्याल्यादारे दि.३ फेब्रूवारी,२०२३ रोजी काढण्यात आलेले परिपत्रक तात्पुरत्या कालावधीकरिता रद्द करुन व मुंबई वॉटर टँकर असो.(नोंदणीकृत) समन्वयाने, सर्व समावेशक असे नविन परिपत्रक काढण्यात यावे, अशी विनंती त्यांनी या पत्रात केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com