अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन्...; रविकांत तुपकर आक्रमक

अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन्...; रविकांत तुपकर आक्रमक

शिंदे-फडणवीस सरकारचा काल (9 मार्चला) पहिला अर्थसंकल्प मांडला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शिंदे-फडणवीस सरकारचा काल (9 मार्चला) पहिला अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिलांसाठी मोठ्या घोषणा शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात आल्या. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे मागचे सोडून द्यायचे अन् पुढच्या घोषणा करत सुटायच्या असे रविकांत तुपकर म्हणाले.

अर्थसंकल्प हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आला आहे. सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी मदतीचं विशेष पॅकेज घोषित करणं गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com