Pahalgam Terrorist Attack : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांचा पाकला इशारा

पहलगाम हल्ला: राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानाला थेट इशारा दिला, भारताच्या सामर्थ्यावर कोणतीही ताकद मात करू शकत नाही.
Published by :
Team Lokshahi

22 एप्रिल रोजी जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादांनी भारतीय पर्यटकांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या दहशतवादी हल्ल्यात 28 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. याचपार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी थेट दहशतवादी आणि पाकिस्तानाला इशारा दिला आहे. "भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला सडेतोड उत्तर देणार आहोत. कोणतीही ताकद भारताला संपवू शकत नाही", असंही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com