Vijay Wadettiwar : भाजपाची पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ते सत्ता टिकवण्यासाठी जीवाचं रान करत आहेत

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रपूर दौऱ्यावर येत आहेत.

आज पंतप्रधान मोदी यांची सायंकाळी ४ वाजता मोरवा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपाची पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते सत्ता टिकवण्यासाठी जीवाचं रान करत आहेत. जनता त्यांना स्विकारणार नाही.

तसेच ते पुढे म्हणाले की, कितीही सभा घेतली तरी विजय हा महाविकास आघाडीचा होणार आहे. आता मोदींची लाट राहिलेली नाही. ऐकायला लोक जातात मात्र मतामध्ये काही परिवर्तन होत नाही. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com