ताज्या बातम्या
आज राज्यात पावसाचा यलो अलर्ट
परतीच्या पावसानं राज्यातल धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. नदी - नाले भरले आहेत.
परतीच्या पावसानं राज्यातल धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. नदी - नाले भरले आहेत. शेती पिकांचं मोठं प्रमाणात या पावसानं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण आठवड्यात विदर्भात कमीअधिक प्रमाणात पावसाचा खेळ सुरुच राहणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतावर सध्या ढगांची दाटी झाली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे.