Weather Alret : महाराष्ट्रात उष्णतेची धडक लाट, अंगाची लाहीलाही जाणवणार; IMD ने जारी केला अलर्ट

Weather Alret : महाराष्ट्रात उष्णतेची धडक लाट, अंगाची लाहीलाही जाणवणार; IMD ने जारी केला अलर्ट

Maharashtra Heatwave: फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात उष्णतेची लाट; राज्यभर 30–36°C तापमान, नागरिकांनी दुपारी घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे IMD ने सांगितले आहे.
Published by :
Dhanshree Shintre
1.

Maharashtra Heatwave: फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात उष्णतेची लाट; राज्यभर 30–36°C तापमान, नागरिकांनी दुपारी घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे IMD ने सांगितले आहे.

2.

कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32–35 अंश सेल्सिअस, तर किमान 23–25 अंश राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत सांताक्रूझ 34–35 अंश, कोलाबा 32–33 अंश राहील. ढगाळ वातावरण आणि हलके धुके जाणवू शकतात.

3.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये दिवसभर उष्ण हवामान राहणार आहे. कमाल तापमान 32–35 अंश सेल्सिअस, किमान 18–22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज. पुण्यात 33–34 अंश, सोलापूरमध्ये 35 अंश तापमान अपेक्षित. कोरडे वातावरणामुळे धुळीचे प्रमाण वाढेल; शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी पाणी नियोजन करावे.

4.

नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होईल. कमाल तापमान 31–34 अंश सेल्सिअस, किमान 17–20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दुपारी खानदेशात उष्ण वारे वाहतील, तर पहाटे थंडी जाणवेल. ढगाळपणा कमी होऊन सूर्यप्रकाश प्रखर राहण्याची शक्यता आहे.

5.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 33–36 अंश सेल्सिअस, तर किमान 18–21 अंश राहील. दिवसभर उकाडा जाणवेल, त्यामुळे शेतीसाठी पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते.

6.

नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये हवामान उष्ण राहणार आहे. कमाल तापमान 33–36 अंश सेल्सिअस, तर किमान 18–22 अंश राहील. अमरावती-अकोला परिसरात 35 अंशांपेक्षा जास्त उष्णता जाणवेल. पहाटे थोडी थंडी, तर दुपारी प्रचंड उकाडा अनुभवास येईल.

7.

एकंदरीत, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत राज्यात उन्हाळ्याचा प्रारंभ झाला आहे. पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी दुपारी घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्णतेच्या तीव्र लाटेस प्रतिबंधक उपाय करून सावधगिरी बाळगावी.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com