
आजकाल अनेकांची सवय असते की झोपण्यापूर्वी मोबाईल चार्जिंगला लावायचा आणि सकाळी पूर्ण भरलेली बॅटरी घ्यायची. हे सोयीचे वाटत असले तरी दीर्घकाळात हीच सवय फोनसाठी घातक ठरू शकते.
रोज सकाळी फुल चार्ज हवा म्हणून अनेकजण फोन रात्रभर प्लगमध्ये ठेवतात. पण बॅटरी पूर्ण भरल्यानंतरही ती सतत वीज घेत राहिली तर तिची क्षमता हळूहळू कमी होऊ शकते.
चार्जिंगदरम्यान फोन गरम होणे सामान्य आहे. मात्र तो उशीखाली किंवा गादीवर ठेवल्यास उष्णता बाहेर पडत नाही. त्यामुळे बॅटरी आणि फोनला इजा होऊ शकते.
रात्री कधी कधी व्होल्टेजमध्ये चढ-उतार होतात. फोन सतत चार्जिंगला असेल तर याचा परिणाम चार्जिंग पोर्ट किंवा आतल्या भागांवर होऊ शकतो.
सतत चार्जिंगमुळे बॅटरीवर ताण येतो. कालांतराने फोन स्लो होणे, अॅप उघडायला वेळ लागणे अशा तक्रारी वाढू शकतात.