राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा जाहीरनामा सादर केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात सर्वच पक्षांमध्ये खलबतं सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने नुकतच बैठकीचं आयोजन केलं होतं.
काही जागा ठरवण्याबाबत विलंब लागतो आघाडी असेल किंवा महायुती असेल तर काही जागा निश्चित करण्यामध्ये विलंब लागत असतो पण लवकरच याबाबत निर्णय होईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. महायुतीत सामील झालेले घटक पक्ष त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झाला नाहीय.