"कापसाला, सोयाबीनला, संत्र्याला भाव नाही. भाव आहे तो, गद्दार आमदाराला आणि खासदाराला. आमदाराचा भाव ५० कोटी आणि खासदाराचा भाव १०० कोटी. पण तुम्हाला भाव नाही"
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात इंडिया आघाडीनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी राहुल गांधींसह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारवर टीका केली.