BREAKING | विराट कोहलीनं सोडलं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद!

BREAKING | विराट कोहलीनं सोडलं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद!

Published by :

जबरदस्त फलंदाज विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपद सोडलं आहे. विराटने हा निर्णय दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर दिला. विराटने सोशल मिडियाच्या माध्यमातून या निर्णयाची माहिती दिली.

विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे त्याने ही कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे केएल राहुलला या सामन्यासाठी भारताचा कर्णधार बनवण्यात आले.

मात्र आता विराटनंतर कोणाकडे टीम इंडियाच्या कसोटी संघाची कमान सोपवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विराटने ट्विट करुन सांगितले की.  "सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे केले असून कोणतीही कसर सोडली नाही. कधीतरी थांबले पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच वेळ आहे. या प्रवासात माझ्यासाठी अनेक चढ-उतार आले आणि माझ्या वैयक्तिक कारकिर्दीतही चढ-उतार आले, पण या काळात माझ्याकडून कधीही प्रयत्नांची कमतरता आली नाही किंवा माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आली नाही. माझा १२० टक्के देण्यावर नेहमीच विश्वास होता."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com