क्रिकेट
Shahid Afridi : "भारतच हल्ले घडवून त्यांच्या लोकांना मारतो...", शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, संतापाची लाट
मात्र अशातच पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने मुक्ताफळं उधळली आहेत.
पहलगाम हल्ल्याचा देशभरातून संताप व्यक्त केला केला जात आहे. जगभरातील अनेक दिग्गजांनी या हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मात्र अशातच पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने मुक्ताफळं उधळली आहेत.
भारतच हल्ले घडवून त्यांच्या लोकांना मारतो, आणि पाकिस्तानला दोष देतो, असं वक्तव्य माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने केलं आहे. तासभर हल्ला होताना 8 लाख जवान कुठे होते? असा सवाल आफ्रिदीने केला.
पुढे तो म्हणाला की, "कोणताही धर्म दहशतवाद स्वीकारत नाही. आणि पाकिस्तान नेहमीच शांतीचा संदेश देतो. आम्ही नेहमीच भारताशी चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचा कबड्डी संघ पाकिस्तानात खेळायला येतो, पण क्रिकेट संघ येत नाही. जर तुम्हाला ते बंद करायचे असेल तर सर्वकाही बंद करा आणि जर तुम्हाला ते चालवायचे असेल तर ते पूर्णपणे चालू द्या".