T20 World Cup
FROM WORLD T20 TO T20 WORLD CUP: ICC EXPLAINS NAME CHANGE AND GLOBAL IMPACT

Cricket News: ‘World T20’ पासून ‘T20 World Cup’ पर्यंत, ICC ने नाव बदलण्यामागचा कारण काय?

T20 World Cup: आयसीसीने World T20 चे नाव बदलून T20 World Cup केले. निर्णय टी२० क्रिकेटला जागतिक दर्जा देण्यासाठी, टीम सहभाग वाढवण्यासाठी आणि क्रिकेटची जागतिक वाढ साधण्यासाठी घेतला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

आयसीसी टी२० वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात होत असताना एका रंजक इतिहासाची आठवण येते. या स्पर्धेला २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत ‘वर्ल्ड टी-२०’ म्हणून सुरुवात झाली आणि भारताने पहिले जेतेपद जिंकले. मात्र, २०२० मध्ये पुरुष आणि महिला दोन्ही टी२० स्पर्धांचे नाव ‘टी२० वर्ल्ड कप’ असे बदलण्यात आले.

हा बदल का आणि कशासाठी, याबाबत तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता नव्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चा रंगली असून, आयसीसीने स्पष्ट केले आहे की, हे नाव जागतिक व्यासपीठावर स्पर्धेचे प्रोफाइल भक्कम करेल आणि टी२० क्रिकेटचा प्रसार वाढवेल. आयसीसीच्या प्रशासकीय मंडळाने सांगितले की, नाव बदलून जागतिक क्रिकेट रणनीतीला गती मिळेल.

यात सदस्य संघांना टी२० सामन्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जा देणे आणि १०० हून अधिक सदस्य देशांना प्रादेशिक पात्रता मार्ग उघडणे हा मुख्य हेतू होता. परिणामी, गेल्या काही वर्षांत पात्रता फेरी सुरू झाल्या आणि संघांची संख्या २० पर्यंत पोहोचली. सलग दुसऱ्या पर्वातही २० संघ खेळणार असून, भविष्यात ही संख्या वाढू शकते.

वनडे क्रिकेटचे नाव आधीच ‘वनडे वर्ल्ड कप’ आहे, तर कसोटी स्पर्धेला ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ असे नाव दिले गेले आहे. टी२० ला आता वर्ल्ड कप म्हणून ओळख मिळाल्याने जागतिक स्तरावर त्याचा दर्जा वाढला आहे. हा बदल टी२० क्रिकेटला वर्ल्ड कपचे वैभव देणारा ठरला आहे. २००७ च्या पहिल्या पर्वानंतर नावातील ‘वर्ल्ड टी-२०’ ते आता ‘टी२० वर्ल्ड कप’ असा बदल स्पर्धेला अधिक व्यापक बनवतो. आयसीसीचा हा निर्णय जागतिक वाढीसाठी महत्त्वाचा असून, नव्या पर्वात रोमांचक सामन्यांची अपेक्षा आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा आता अधिक समृद्ध आणि समावेशक झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com